पांडवांच्या महाप्रयाणानंतर अर्जुनाचा नातू आणि अभिमन्यूचा मुलगा परिक्षीत हस्तीनापुरचा राजा बनला. प्रत्यक्षात पांडव भावांकडून विद्या प्राप्त केलेले परिक्षीत सर्वगुण संपन्न महाप्रतापी राजा होते. परिक्षीत गुरू कृपाचार्य आणि युयुत्सू दोघांच्या निगराणी खाली उत्तम प्रकारे राजधर्माचे पालन करत होते. परिक्षीतांचा विवाह उत्तर राजाची कन्या इरावती सोबत झाला. आणि त्यांना जनमेजय, भीमसेन, श्रुतसेन आणि उग्रसेन नावाचे चार पुत्र झाले.